Sunday, June 26, 2005

कविता 'मय'

Kavitamay

तु
रे कधी कवी झालास ? ; सवाल एकानॆ विचारला
अंतर्मुख झाल्यावर एक भाव प्रकट झाला

मन फक्त कविंनाच असतं ; झाला समज जेव्हा लोकांचा
तेव्हा जागा झाला ; कवी माझ्या मनातला

खरं पाहिलं तर मन सर्वांना असतं
आणि कवीचं अस्तित्व प्रत्येक मनात असतं

फक्त मनात वाकून बघा ; हरवून जा स्वत:च्याच विश्वात
मग काय कमी आहे हो तुमच्यात आणि आमच्यात

बघा मग कविता कशा सहज सुचतील
शब्द अपुरॆ पडावेत इतकॆ विचार मनात येतील

मनातल्या मौनाची गाठ अलगद सुटेल
अन् वाहत्या काव्याचा खळंखळं झरा फुटेल

शब्द किंवा भाषॆची आडवी यॆणार नाहीत बंधनं
ऎकू येतील सर्वांना तुमच्या ह्रदयाची स्फंदनं

कधी बघाल ; डोळॆ दिपून जातील अशी सौंदर्यसृष्टी
कवितातून कराल तिच्या कौतुकाची वृष्टी

कधी मनात प्रॆमाची कळी फुलून येईल
तिच्या सुगंधांनी कविता आसमंत भरू पाहिल

कधी दाटून येतील काळॆ मॆघ भावनांचॆ
त्यांना पाझरायला आहेत हे थॆंब कविताचे

कधी वादळॆ येतील तुम्हाला आडवं पाडायला
कविता उभ्या राहतील त्यांच्याशी झुंजायला

कधी प्रज्वलित होईल एखादी ज्योत विचारांची
कविता देईल सर तिला सुर्यप्रकाशाची

कविता कधी काल्पनिक ; तर कधी अनुभवांची
कधी साऱ्या दुनियेची ; तर कधी एकाकी वाटेवरची

कविताच्या या राज्यात शब्द राहतात संगी
अर्थांच्या आकारात अन् कल्पनांच्या रंगी

कवितांच्या वाटेवर येता येता घडतॆ असॆ काही
की माझी कविता ; का मी कवितांचा असा फरकच उरत नाही

साथ सॊडली आपुल्यांनी तरी कविता साथ सोडत नाही
इतका सच्चा साथी ; उभ्या आयुष्यात सापडत नाही

अशी होती ही सैर आमच्या कविताच्या राज्याची
वाट बघत आहॊत तुमच्या वारंवार येण्याची

~ योगी...

Monday, June 13, 2005

परिक्षा

Pariksha

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर; एक परिक्षा असते

नकोशी झाली कितीही; तरीही ती दयायचीच असते

या परिक्षेची रीत जराशी वेगळीच असते

pass झाल तरीही ; आणखी एक बाकीच असते

revaluation , ATKT ची सोय इथे मात्र नसते

fail झाल तर पुन्हा तीच परिक्षा कधीच नसते

जन्म म्हणजे hallticket; आयुष्यभराचं time-table असते

examiner स्वत:मध्येच लपलेला ; अन् समाधान हीच degree असते

marks किती मिळाले ? यावरुन यश ठरत नसते

परिक्षा काय शिकवून गेली ; हेच जास्त महत्वाचे असते

अभ्यास कितीही केला ; तरी परिक्षेची वेळ वेगळीच असते

कळ्तयं पण वळत नाही अशीच काहीशी गतं असते

एकाच प्रश्नासाठी ; डोक्यात अनेक उत्तरांची गर्दी असते

खरं उत्तर कोणतं ? हे कळणंच फार कठीण असते

मनातल्या अर्जुनाला विवेकाच्या श्रीकृष्णाची गरज असते

नुसती गती असून भागत नाही ; त्याला दिशाही आवश्यक असते

नशीबाच्या कागदावर जेव्हा प्रयत्नांची शाई असते

पाणी पडले, तरी मिटणार नाही ; इतकी ती भक्कम असते

समोरच्या प्रश्नांबरोबर झुंज नेहमीच दयायची असते

स्वत: उत्तरे शोधून जगायलाच तर ती शिकवतं असते

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर एक परिक्षा असते

~ योगी...